कवच २०२३ सायबर सिक्युरिटीचे हॅकाथॉनचे उदघाटन








कवच २०२३ सायबर सिक्युरिटीचे हॅकाथॉनचे उदघाटन
पनवेल दि.१०(संजय कदम): कवच 2023 सायबर सिक्युरिटी हॅकाथॉनचे उद्घाटन नोडल सेंटर नवीन पनवेल येथे महाराष्ट्र डीटीईचे संचालक डॉ. विनोद मोहितकर यांच्याहस्ते झाले. यावेळी एआयसीटीईचे सल्लागार डॉ. आर. उन्नीकृष्णन यावेळी उपस्थित होते. त्यांनी आपल्या उद्घाटन भाषणात प्रमुख पाहुण्यांनी आजच्या जगात “इनोव्हेट ऑर नाश” हा नवा मंत्र आहे यावर भर दिला. तसेच भारताच्या इनोव्हेशन ग्लोबल रँकमध्ये 2015 मधील 81 व्या क्रमांकावरून 2022 मध्ये 40 व्या क्रमांकावर आल्याची माहिती देत 2020 ते 2023 या कालावधीत सायबर गुन्ह्यांमध्ये 121% वाढ झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


या कार्यक्रमात पिल्लई कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, नवीन पनवेल यांनी यजमान म्हणून काम केले आणि 22 सहभागी संघ आणि मूल्यांकनकर्त्यांना सर्व तांत्रिक सहाय्य आणि आदरातिथ्य प्रदान केले. स्पर्धेच्या 36 तासांच्या यशस्वी पूर्ततेवर मूल्यांकनकर्त्यांनी त्यांच्या परस्परसंवादावर आणि त्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीवर आधारित विजेत्यांची निवड करण्यात आली. दरम्यान आज झालेल्या या समापन समारंभात कवच 2023 च्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली. या स्पर्धेत प्रत्येक विजेत्या संघाला एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.यावेळी सीईओ डॉ. के. एम. वासुदेवन पिल्लई, सीओओ डॉ. प्रियम पिल्लई, आयपीएस संजय शिंत्रे, सल्लागार डॉ. आर. उन्नीकृष्णन, प्रादेशिक सल्लागार MoE, इनोव्हेशन सेल डॉ. सौरभ निर्मळे, ऋषिकेश आघाव, प्राचार्य डॉ. संदीप जोशी, संचालक पीआर, एमईएस डॉ. निवेदिता श्रेयांस, आणि डॉ. रिचा अग्रवाल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.



 या कार्यक्रमात डॉ. वासुदेवन पिल्लई म्हणाले की, सरकार आता आयआयटी आणि एनआयटी व्यतिरिक्त खाजगी संस्थांना संशोधन निधी मंजूर करण्यात रस घेत असल्याचे सांगितले. तर डॉ. प्रियम पिल्लई यांनी सहभागींना भर देत कवच 2023 चा ग्रँड फायनल हा फायनल नाही आणि अंतिम पराकाष्ठा उत्पादनातच असली पाहिजे. विजेते हे एका रात्रीत तयार होत नसून ती अनेक वर्षांच्या चिकाटीने आणि समर्पित प्रयत्नांची पायरी-पायरी प्रक्रिया असते, याची जाणीवही त्यांनी विद्यार्थ्यांना करून दिली. आयपीएस संजय शिंत्रे यांनी सांगिलते की, महाराष्ट्राच्या सायबर सेलला दररोज सुमारे 1000 सायबर फसवणूक झालेल्यांचे फोन येतात. तसेच पुढे सांगितले की, सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या धोक्याला आळा घालण्यासाठी आणि सायबर गुन्हेगारांच्या प्रत्येक कार्यपद्धतीचा प्रतिकार करण्यासाठी, महाराष्ट्र शासनाने महापे उद्योग विकास महामंडळाच्या मिलेनियम बिझनेस पार्कमध्ये महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प सुरू केला आहे. यामुळे सायबर क्राईममधील विद्यार्थ्यांना इंटर्नशिपही मिळेल असे सांगितले. 


थोडे नवीन जरा जुने