डाळींच्या दराने दिवाळीच्या आधीच कोलमडले सर्वसामान्यांचे बजेट





पनवेल दि. १७ (वार्ताहर) : ऐन सणासुदीच्या तोंडावर सर्वसामान्यांना महागाईची झळ बसणार आहे. दिवाळीच्या आधीच डाळींच्या दरात वाढ सुरू झाली आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे डाळींच्या पिकांनाही फटका बसला असून पावसामुळे अनेक ठिकाणी पीक पाण्याखाली गेले आहे तर काही ठिकाणी पाणी लागून नुकसानही झाले आहे. 


त्यामुळे डाळींचे उत्पादन कमी होण्याची दाट शक्यता आहे. तसेच पावसामुळे तयार झालेले पीकही हातातून जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. या सर्वांचा परिणाम डाळींच्या दारांवर होत असून त्यांच्या घाऊक आणि किरकोळ दरात वाढ सुरू झाली आहे.



यावेळी सर्व डाळींच्या तुलनेत तूरडाळीचे दर सर्वाधिक वाढले आहेत. तूरडाळीचा भाव गेल्या आठवड्यात घाऊक बाजारात चार ते पाच रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे घाऊक बाजारात तूरडाळ ११०-१२० रुपये किलोपर्यंत गेली आहे. तर, किरकोळ बाजारात हे दर १२०, १२५ ते १३० रुपये किलोपर्यंत आहेत. 


उडीद डाळ ९७ ते रुपये किलो दराने मिळत होती. १०० मात्र ऐन दिवाळीआधी उडीद डाळीचा दर १०५ ते ११० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. मूगडाळ घाऊक बाजारात ९० ते १०० रुपये आहे. किरकोळ बाजारात मूगडाळ १०० ते १२० रुपये किलो झाली आहे. दिवाळीत चणाडाळीला सर्वाधिक मागणी असते. त्यामुळे चणाडाळही महागली आहे. चणाडाळ ५९ ते ६५ रुपये किलो असून किरकोळ बाजारात ६० ते ७०-७५ रुपये किलो झाली आहे.



थोडे नवीन जरा जुने