एस.ई. झेडग्रस्त शेतक-यांचे लागले सरकारचे निर्णयाकडे डोळे.







उरण दि १७(विठ्ठल ममताबादे )
मे. महा मुंबई एस. इ. झेड लिमिटेड या कंपनीला सन २००६ मध्ये महाराष्ट्र शासनाने उरण पनवेल पेण तालुक्यातील ४५ गावाचे विशेष आर्थिक क्षेत्र स्थापन करण्याकरीता जमीन मिळकती साठे कराराने विकत घेण्याची परवानगी दिली होती. परंतु सेझ कंपनी जमीन मिळकती विकत घेण्यास असमर्थ ठरली.





विकास आयुक्त उदयोग यांचे दि.१६/६/२००५ रोजीचे आदेशानुसार कंपनीतर्फे खरेदी करण्यात आलेल्या व शासनातर्फे भूसंपादित करण्यात आलेल्या भूखंडावर १५ वर्षाच्या आतमधे विशेष आर्थिक क्षेत्र स्थापन करण्यास कंपनी असमर्थ ठरल्यास कंपनीने विकत घेतलेल्या किंमतीमधे शेतक-यांना जमीन मिळकती त्याच किमतीला परत कराव्यात असे आदेश दिले होते.




कंपनी विशेष आर्थिक क्षेत्र(स्पेशल इकॉनॉमिक झोन )स्थापन करण्यास असमर्थ ठरल्यामूळे संबंधित शेतक-यांनी जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे नोव्हेंबर २१ पासून एकूण ५२३ अर्ज दाखल केले आहेत. या विषयी सन २०२२ च्या उन्हाळी अधीवेशनामधे ऍड.शेलार यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यावेळचे उदयोग मंत्री सुभाष देसाई यांनी सदरची सुनावणी तीन महीन्यामधे संपवून निकाल दिला जाईल व शेतक-यांना त्यांच्या जमीनी परत देण्यात येतील असे उत्तर दिले होते. त्याची अंतिम सुनावणी दि.१५/२/२०२३ रोजी अतिरीक्त जिल्हाधिकारी रायगड यांचे कडे झाली असून शेतकरी अर्जदारातर्फे त्यांची बाजू ऍड.दत्तात्रेय नवाळे, ऍड.वृषाली पाटील, ऍड.कुणाल नवाळे




ऍड.निलेश पाटील यांनी मांडली तर एस.ई. झेड कंपनी तर्फे कंपनीची बाजू ऍड.वारटक्के अलिबाग यांनी मांडली. दोन्ही बाजू ऐकून ऐकल्या नंतर सदर अपीलाचा निकाल जिल्हाधिकारी रायगड स्वतः घेतात की महाराष्ट्र शासन धोरणात्मक निर्णय घेणार ? यावर आता सर्व शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. ज्या नेत्यांनी जमीनी परत देण्यासाठी २०२२ च्या उन्हाळी अधिवेशनामधे शेतक-यांची बाजू मांडली तेच नेते आता सत्ताधारी झाले आहेत. त्यामुळे सरकारकडून सकारात्मक निर्णय होईल अशी आशा सर्व शेतक-यांनी व्यक्त केली आहे.




थोडे नवीन जरा जुने