पनवेल दि.०६ (वार्ताहर) : जितेंद्र आव्हाड त्वरित माफी मागा अन्यथा भाजपा युवा मोर्चा राज्यभर औरंगजेब धार्जिण्या आव्हाड यांचे पुतळे जाळून निषेध आंदोलन करणार असा इशारा भाजपचे महाराष्ट्र सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना दिला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज उभ्या महाराष्ट्राची अस्मिता आहेत आणि जितेंद्र आव्हाड सारखी औरंगझेब आणि शायीस्तेखानाची पिलावळ जर महाराजांचा असा अपमान करणार असेल तर भाजपा हे मुळीच खपवून घेणार नाही. जितेंद्र आव्हाड हे जाणीवपूर्वक वारंवार ठरवून करीत आहेत हे महाराष्ट्राला कळून चुकले आहे
आणि आता ते शिव प्रेमींच्या भावनांचा अंत पाहत आहेत.जितेंद्र आव्हाड यांनी या विषयात त्वरित माफी मागावी अन्यथा युवा मोर्चा राज्यभर औरंगजेब धार्जिण्या आव्हाड यांचे पुतळे जाळून निषेध आंदोलन करेल आणि आव्हाडांनी जर अशी नालायकपणाची वक्तव्य त्वरित थांबवली नाहीत तर औरंगजेबाच्या या पिलावळीला भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्रात फिरू देणार नाही.
Tags
पनवेल