पाताळगंगा : ८ फेब्रुवारी ,खालापूर तालुक्यात वालाची शेती बहरली असून वालाच्या शेंगा तुरळक ठिकाणी बाजार पेठेत दाखल झाल्या असल्यामुळे या शेंगा खरेदीची लगबग सुरु झाली आहे.मात्र वालाच्या शेंगा बाजार पेठेत मुबलक प्रमाणात येण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागेल असे शेतात काम करणा-या शेतक-यांने प्रतिनिधी शी बोलताना सांगितले.
पावसाला संपताच हिवाळा हा ॠतू सुरु होतो.आणि पावसाळी झालेल्या शेतीचे नुकसान शेतामध्ये कडधान्याची लागवड करून उत्पन्न मिळवले जाते.शिवाय कडधान्य यांना पाण्याची आवश्यकता अल्प प्रमाणात असते.रात्रीच्या वेळी पडणा-या धुके मुळे शेतीला पाणी आणि पोषक द्रव्य मिळत असते .यामध्ये मुग,हरभरा,मका ,तूर,वालाच्या शेंगा असे अनेक प्रकारच्या कडधान्याची लागवड शेतकरी वर्ग करीत आहे.
शिवाय वालाच्या शेंगा सुकून त्याचे वाल तयार होत असते.हेच वाल रोजच्या दैनंदिन जीवनात कडधान्य म्हणून वापरले जाते.शिवाय या वालाची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने शेतक-याला आर्थिक नफा मोठ्या प्रमाणात होत असतो या सर्व कारणावरून ग्रामीण भागात वालाची शेती मोठ्या प्रमाणात केली जात असल्यामुळे शेतक-याला हिवाळी पिके ही अत्यंत महत्वाची वाटतात शिवाय अनेकांना रोजगार मिळत असतो.वालच्या शेगांची शेती बहरली असून सुगंध दरवळत आहे.
Tags
पाताळगंगा