टाटा कॅन्सर सेंटर संदर्भात आमदार महेश बालदी यांची दिल्लीवारी






पनवेल(प्रतिनिधी) कर्करुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता खारघर येथे असलेल्या टाटा मेमोरियल रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर सेंटरमध्ये रुग्ण खाटा व त्यासाठी आवश्यक असलेला मनुष्यबळ वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही होण्यासंदर्भात उरणचे आमदार महेश बालदी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्य मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांची नवी दिल्लीत भेट घेतली. 


        कर्करोगावर उपचार घेण्यासाठी महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून रुग्ण खारघर येथील टाटा मेमोरियल रुग्णालयात येत असतात. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आमदार महेश बालदी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे या रुग्णालयातील रुग्ण खाटा व त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ वाढविण्याची मागणी टाटा हॉस्पिटलच्या मागणीनुसार केली होती. या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्य मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्याकडे संवाद साधत पत्रव्यवहार व पाठपुरावा होता. त्या अनुषंगाने टाटा हॉस्पिटल मधील मनुष्यबळाची संख्या तब्बल २४०५ तर रुग्ण खाटांची संख्या ९३० करण्यात येणार आहे.


 त्यानुसार पुढील कार्यवाहीसाठी हि भेट महत्वाची होती. कर्करोग रुग्णांची परिस्थिती आणि उपचार या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी टाटा हॉस्पिटलचे डॉ. सुधीर गुप्ता यांच्याशी चर्चा केली होती. त्या अनुषंगाने नोव्हेंबर २०२२ मध्ये या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे वाढीव रुग्ण बेड आणि आणि मनुष्यबळाची मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने त्यांनी केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्य मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांच्याकडे त्या संदर्भातील संवाद आणि पाठपुरावा केला होता. त्यानुसार अवघ्या तीन महिन्यात मोदी सरकारने रुग्ण खाटा व त्यासाठी आवश्यक असलेला मनुष्यबळ वाढविण्याचा निर्णय घेतला असून पुढील तातडीच्या कार्यवाहीसाठी यावेळी चर्चा झाली. 



थोडे नवीन जरा जुने