काशिनाथ जाधव : प्रतिनिधी
पाताळगंगा १ मे :- वाहनांची गर्दी आणि अपघात यावर काही अंशी नियंत्रण ठेवणारे म्हणून गतिरोधकांकडे पाहिले जाते. यामुळे ते अत्यावश्यक आहेत; पण ते करताना नवीन संकटे ओढवून घेण्यात आल्याचे चित्र सर्रास पाहायला मिळते. असाच प्रकार सावरोली - खारपाडा या मार्गावरील कुंभिवली येथे नव्याने बनविण्यात आल्यांने गतिरोधक या ठिकाणी पहावयास मिळत आहे. मात्र या ठिकाणी अक्षरश: नियमांची पालमल्ली होताना दिसते.
गतिरोधक ज्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणापासून चाळीस मीटर अंतरावर सुरक्षिततेचे पांढरे पट्टे असतात,किंवा फलक लावण्यात आलेले असतात; पण काही ठिकाणी त्याचा अभाव दिसून येत नाही. यामुळे गतिरोधकांच्या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढले आहे. परिणामी या गरजेच्या गतिरोधकांबद्दल नागरिकांच्या मनात असुरक्षितेची भावना निर्माण होत आहे.
पादचार्यांच्या सुरक्षिततेसाठी व वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी गतिरोधक उभारले जातात.गतिरोधक हळूहळू उंचावत जाणारा व शिखरावर सपाट असलेला उंचवटा तयार करून गतिरोधक निर्मिती झाली पाहिजे,एखाद्या वेळेस कोणाला अर्जंट असेल, तर ते गतिरोधक दिसत नसल्यामुळे वाहने जोरात असतात. वाहनांची त्याठिकाणी गती कमी होत नाही.यामुळे अपघात होतात
सर्वात जास्त अपघात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात घडत असतात.काही वेळेस ज्येष्ठांना व गर्भवती स्त्रियांना याचा त्रास होत आहे.हे गतिरोधक मुख्य गर्दीच्या रस्त्यांवर गतिरोधक नसावेत.डांबराच्या पातळ पट्टय़ा वापरून वाहनांचा वेग कमी करावा.यामुळे वाहनचालकाच्या चटकन लक्षात येत असल्याने हा अपघात टाळता येऊ शकतो.डांबराच्या पातळ पट्टय़ा चालकांच्या लक्षात येण्यासाठी थर्मोप्लॅस्टिक रंगाने रंगविलेल्या असाव्यात.कारण गतिरोधक पांढर्या रंगांनी रंगविलेले असावेत.आणि गतिरोधक असल्याची माहिती देणारे फलक असावेत. असे गतीरोधकाचे नियम आहे मात्र हे नियम पायमल्ली होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहे.
Tags
पाताळगंगा